मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

हाडांच्या कारखान्यामुळे परिसरात दुर्गधी बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे

बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे बिलोली शहरातील कोंडलापुर मार्गावरील हाडाच्या कारखान्यात जनावाराची हांडे महाराष्ट्र व तेंलगणा राज्यातुन आयात करुन त्या हाडावर प्रकिया करुन त्या हाडांचे पावडर  दुसऱ्या राज्यामध्ये विक्री साठी नेतात कारखान्याच्या परिसरात दुर्गधी येत आसुन परिसरातील नागरिकांना यांचा मोठा मनस्ताप होत आहे बिलोली शहरापासुन दोन कि मी अंतरावर हा  कारखाना आहे  कोंडलापुर नाग्यापुर  सुलतानपुर ग्रामपंचायत हाद्दीतील हा मला मोठा कारखाना उभा करण्यात आला तेंलगणा राज्यातुन दररोज दोन ते तिन ट्रक जनावाराचे हाडे बिलोली शहारातुन कारखान्यात नेले जातात  शहरातुन जात आसताना मोठ्या प्रमाणात दुर्गधी पसरली जात आहे या कडे संबंधित प्रदुषण नियंत्रण मंडळ अर्थपुर्ण संबधामुळे गप्प आहे   अशा कारखान्यावर जिल्हा प्रदुषण नियंत्रण मंडळ जातीने लक्ष घालुन अशा कारखान्याना महाराष्ट् शासन प्रदुषण  मंडळाची परवानगी देवु नये अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे
अलीकडील पोस्ट

मौजे गंजगाव येथे राष्ट्रसंत डाँक्टर शिवलींग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांना भावपुर्ण श्रध्दांजली

बिलोली प्रतिनिधी  बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव येथे राष्ट्रसंत डाँक्टर शिवलींग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांचे वयाच्या 104 वर्ष 1 सप्टेंबर 2020 रोजी निधन झाले आज दिं 14 सप्टेंबर 2020 रोजी मारोती मंदीर परिसरा सामोर सर्व गावकर्याच्या वतीन शोकसभा आयोजीत करुन श्रध्दांजली वाहीण्यात आली या प्रसंगी शिवभक्त भिमराव पाटील बावलगावकर यांच्या किर्तनाचा कार्यक्रम या प्रसंगी आयोजित करण्यात आला होता  किर्तनकार भिमराव पाटील रामराव पाटील माणिकराव पाटील यांच्या हास्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार व दिप प्रज्वलित करुन आदरांणजली वाहीण्यात आली यावेळी रामराव पाटील माणिकराव पाटील हाणमंतराव पाटील मारोती पाटील गोविद पाटील शिवराज पाटील विश्वनाथ महाराज शिवकुमार मोठे नागनाथ पाटील बसवंत पाटील इत्यादी ची प्रमुख उपस्थिती होती अन्नदान करुन सर्व गावकरी मंडळी च्या वतिन महाराज श्रध्दांजली वाहीण्यात आली शासनाने दिलेल्या सुचनेचा काटेकोर पणे पालन करुन शोकसभा संपन्न झाली

*बिलोली तालुक्यातील भटक्या जमातींच्या समस्या कधी संपणार_विजय सुर्यवंशी*

विशेष प्रतिनिधी नांदेड  आज देशाला स्वातंत्र्य मिळुन 73 वर्ष पूर्ण झाली तरी देशातील गोर-गरिब आणि भटक्या जमातीचे प्रश्न अजुन सुटलेले नाहीत. अश्या भटक्या जमातीतील पारधी आणि चितोजेय समाजातील लोकसंख्या बिलोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे हा समाज आजही मुलभूत गरजा पासुन वंचित आहे कारण या दोन्ही समाजातील बहुतांश लोकांना अजूनही हक्कांचा निवारा मिळालेला नाही.आजंही बहुतांश लोक ग्रामिण रुग्णालय बिलोली या परिसरात रस्त्यावरच आपली गुजराण करत आहे त्यांची समस्या समजून घ्यायला कोणताही पुढारी समोर येत नाही. अश्या कठीण परिस्थितीत आपली आयुष्याची घटका मोजण्याच्या पारधी व चितोडीच्या या समाजातील लोकांना कोरोनाच्या संकटामुळे आणखी संकटाच्या खाईत लोटले अश्या हाताला कोणताही कामधंदा नसल्याने पोटाची खळगी भरणे सुद्धा त्यांना आवघड होऊन बसले आहे एक संवेदनशील समाजातील जबाबदार नागरिक म्हणून बिलोली  तालुक्यातील लोकप्रतिनिधीसह दानशुर नागरीकांनी  या दोन्ही समाजातील गरजू लोकांना त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची आणि उत्तम प्रकारे ते रांहु शकतील अश्या निवाय्राची  सोय करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग...

किराना दुकानदार झाले मालामाला ग्राहकांचे होत आहे बेहाल

नांदेड प्रतिनिधी  –वैभव घाटे  कोरोना ला आळा घालण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली आहे. या गोष्टीचा गैरफायदा घेऊन बिलोली तालुक्यातील काही दुकानदार किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंची जास्त भावाने विक्री करून परिस्थितीचा गैरफायदा घेऊन नागरिकांना लुटत आहेत. महाराष्ट्र व संपूर्ण देशात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने कोरोना ला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 31 मार्चपर्यंत तर केंद्र सरकारने 14 एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे. असे असले तरी नागरिकांना किराणा दूध भाजीपाला औषधे यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये, यासाठी दररोज एका ठराविक काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडे ठेवण्यासाठी परवानगी दिलेली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा अजिबात तुटवडा भासू नये, यासाठी सरकार विशेष खबरदारी घेत आहे. असे असले तरी बिलोली तालुक्यातील काही दुकानदारांकडून किराणा सामानासह जीवनावश्यक वस्तूंची जास्त दराने विक्री केल्या जात असून नागरिकांना खुलेआम लुटले जात आहे. साठेबाजी करून नागरिकांकडून जास्त पैसे घेऊन माणुसकी विकून खात आहेत   संपूर्ण देश...

धामणगाव येथील हजरत सय्यद बाबु पिर उर्स संदल रद्द,

हजरत सय्यद बाबु पिर उर्स संदल निमित  दर्गाह येथे नागरिकांनी जमा होऊ नये- स.पो.नि. भाऊसाहेब मगरे मुखेड प्रतिनिधी /भारत सोनकांबळे सद्यस्थितीत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात  कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य विषाणू ने थैमान घातले आहे, या कोरोना विषणुपासून बचाव करण्यासाठी जनतेनी घराबाहेर पडू नये म्हणून जनता कर्फुच्या माध्यमातून २१ दिवसाचे  लॉकडाऊन चे आदेश सरकारने दिले आहेत.तसेच देशात सर्वत्र कलम १४४ (जमाव बंदी) लागू करण्यात आला असल्याने मुखेड तालुक्यातील धामणगाव येथे होणारा प्रसिध्द व पारंपरिक हजरत सय्यद बाबु पिर उर्स संदल व यात्रा कोरोनाच संकट व संचारबंदी असल्यामुळे या वर्षी  उर्स संदल यात्रा रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय गावकरी व पोलीस प्रशासनाच्या वतीने नुकताच घेण्यात आला आहे. हजरत बाबु पिर उर्स संदल दि.८ व ९ एप्रिल रोजी आयोजीत करण्यात आला होता.देशातील कोरोना च्या संकटाचे व संचारबंदी ची पार्श्वभूमी लक्षात घेऊन हा महत्त्वपर्ण निर्णय घेण्यात आल्याचे  गावकरी व मुखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब मगरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म...

बेटमोगरा येथील नाथ गोसाई भिक्षुकाना धान्य वाटप.

मुखेड प्रतिनिधी / भारत सोनकांबळे सद्यस्थितीत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात  कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य विषाणू ने थैमान घातले आहे, या कोरोना विषणुपासून बचाव करण्यासाठी जनतेनी घराबाहेर पडू नये म्हणून जनता कर्फुच्या माध्यमातून २१ दिवसाचे  लॉकडाऊन चे आदेश देण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्भूमीवर हातावर पोट असणाऱ्या गोर गरीब जनतेला धान्य पुरवठा संदर्भात तालुक्याचे आमदार डॉ.तुषार राठोड यांनी कार्यकर्त्यांना आदेशित केले होते त्या अनुषंगाने बेटमोगरा येथे धान्य वाटप करण्यात आले. ‘कोरोना विषाणू' संसर्गाने देश लॉकडाऊन झाला आहे.यामुळे देशातील अनेकजण आर्थिक संकटात सापडले आहेत.विशेषत: ज्यांचे पोट हातावर आहेत असा गरीब वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे अशा परिसथितीमध्ये ते लोक करावेत तरी व खावेत तर काय असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे, असे लोक उपाशी राहू नये, म्हणून मुखेड तालुक्याचे विद्यमान आमदार डॉ.तुषार राठोड यांनी कार्यकर्त्यांना आदेशित केले होते त्यांच्या आदेशाचे पालन करून तालुक्यातील बेटमोगरा गावातील युवा नेते तथा कृषी उत्पन्न बाजार सम...

शासनाचा सुशिक्षित बेरोजगार नर्सेसच्या जिवाशी खेळ - ब्रदर आदी बनसोडे यांचा सरकारशी थेट आरोप

मुखेड प्रतिनिधी भारत सोनकांबळे महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी लाखो नर्सेस उत्तीर्ण होतात, यामध्ये एएनएम,जिएनएम, बिएससी नर्सिंग असे लाखो रुपये खर्च करून शिक्षण घ्यावे लागते लगेच खाजगी हाॅस्पिटल मध्ये कामासाठी भन्नाट फिरुन ड्युटी जाॅईन करतात ते पण सात ते आठ हजार महिना काम करतात, २०१६ च्या कोर्ट नियमानुसार खाजगी नर्सेसला दवाखान्याच्या बेड वरुन म्हणजेच विस ते पंचवीस हजार पगार द्यावा असे कोर्ट म्हणतो तो नियम लागू करत नाहीत, आणि खाजगी हाॅस्पिटल मध्ये बोगस स्टाॅफ भरती करुन पाच हजार महिना काम देतात,मग रजिस्टर नर्सेस कुठे जायचं,लाखो रुपये तिन ते चार वर्ष शिक्षण घेऊन पाच हजारांवर महिना लाज वाटत आहे.. आता महत्वाचे म्हणजे कोरोणा व्हायरस आला आहे सर्व देशभरात भीतीचे वातावरण तयार झाले, शेजारच्या देशात आरोग्य सेवा देणारे डाॅक्टर, नर्सेस व इतर स्टाॅफ कोरोणाच्या रुग्णांचा उपचार करुन तेच मरण पावले आहेत, तरीही नर्सेस ड्युटी करत आहेत,  महाराष्ट्रात सरकारी दवाखाने असे आहेत की, तिन तेरा नऊ अठरा वाजलेली परिस्थिती आहे,तातडीच्या वेळी सोईसुविधा उपलब्ध नाहीत, तातडीचे इंजेक्शन नाहीत, डॉक्टर नर्सेस ...